HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्यच, पण….! । अमृता फडणवीस

मुंबई । राज्यात ब्रेक द चेन या मिशनअंतर्गत ठाकरे सरकारने आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेले हे नवे नियम आजपासून म्हणजेच २२ एप्रिल लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांच्या मुद्द्यांवरून राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतरे आहे. मात्र, अशातच आता एरव्ही ठाकरे सरकारवर कडाडून टीका करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अमृता फडणवीस ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत बोलताना म्हणाल्या की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत.” अमृता फडणवीस या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतची आली भूमिका स्पष्ट केली आहे. “लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल”, असे मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Aprna

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात ! – मुख्यमंत्री

Aprna

विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार !

News Desk