HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांचे टिकाकरांना सडेतोड उत्तर…! म्हणाल्या…

मुंबई | अमृता फडणवीस यांनी मुंबई असुरक्षित आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टिकेची झोड उठली होती. अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावं अशी ही टिका त्यांच्यावर झाली. आता अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत आपल्यावर टिका करणाऱ्यांना उत्तर दिलयं ,त्यांनी लिहीलय की, सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है !

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी २ दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून मुंबईत राहणे असुरक्षित आहे असे बोलत मुंबई पोलिसांच्या कामावर अविश्वास दाखवला होता. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांनी त्यांच्यावर पलटवार केला. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत मुंबई पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत असे ट्विट करत अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे की , आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच.तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट”, काल (५ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे अनेक भागात पाणी भरले होते. सेंट्रल रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने लोकांना एनडीआरएफ यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांना बळ दिले : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

News Desk

“चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या”, राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

News Desk

फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्र द्रोही केलं, शुभम शेळकेंचा घणाघात!

News Desk