HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज; संजय राऊतांचा टोला

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप-राष्ट्रवादीनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केले. यानंतर राज्यात विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबतची युती ही आमची ऐतिहासिक चूक होती, असं वक्तव्य केलं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज (३१ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “भरकटलेल्या मनाची माणसं ही गांजा प्यायलासारखी बोलतात. राजकारणामध्ये आता विरोधी पक्ष भरकटलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार”, असे राऊत म्हणाले. तसेच ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवारांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकली आहेत. पण, कोणत्या पक्षाने कोणा बरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील तीन पक्षांनी काय करावं हे ठरवलेलं आहे, असा टोला संजय राऊतांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला आहे.

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज

राऊत पुढे म्हणाले, “भाजपला कधी राष्ट्रवादीबरोबर जावसं वाटतं. तर कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्याचं ते म्हणतात. तर कधी अजून काय म्हणतात. त्यामुळे भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज आहे. डोकी थंड झाली की त्यांनी महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांचं मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नवं वर्षात प्रार्थना करतो”, असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

देशद्रोहाचा गुन्हा स्वस्त झाला

दरम्यान, कर्नाटकमध्ये तरुणांवर झालेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३८ तरुण तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, जी विटंबना झाली, त्याचा त्यांनी निषेध केला. त्यांनी आंदोलन केलं. पण, म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? जिथे भाजपचं राज्य आहे, तिथे देशद्रोहासारखा गुन्हा होऊ शकतो का? देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही? असे सवालही राऊत यांनी केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंपदाचे १०४ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस! – जयंत पाटील

Aprna

शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त!, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

News Desk

संत भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा! – पंकजा मुंडे

Aprna