HW News Marathi
महाराष्ट्र

“हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…”आनंद महिंद्रांचा आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!

मुंबई | प्रसद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट्समुळे कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणानकली होती. तर त्यांचे आभार देखील मानले होते.. देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असताना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी करोनाच्या सुरुवातीच्या दिवसांप्रमाणेच आजही आपल्या जिवावर उदार होऊन रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांना सलाम ठोकला आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

आनंद महिंद्रांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक शेर देशातल्या लाखो आरोग्य सेवकांसाठी लिहिला आहे. “वो कोई और चिराग होते है जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…” असं ट्वीट Anand Mahindra यांनी केलं आहे. त्यासोबतच खाली “अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!”, असं देखील त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्याआधी आनंद महिंद्रा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच परखड बोल सुनावले होते. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लादल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखी मानले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडकिल्ले लग्न, सभारंभांसाठी भाड्यावर देणार नाही, पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

News Desk

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांकडून एकजण ताब्यात

News Desk

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna