HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेशकडून मदतीचा हात ! ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा

मुंबई । राज्यात कोरोनास्थिती गंभीर आहे. तर आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हीरचा तुटवडा, कोरोना लसीकरणातील राजकारण यासारख्या अनेक आव्हानांना सध्या महाराष्ट्र सामोरे जात आहे. मात्र, आता आंध्र प्रदेशने महाराष्ट्राला मदतीचा हात दिला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर आता जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याचसोबत, महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीही नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत.

रेमडेसिव्हीरचा हा पुरवठा वाढवण्यासाठी नितीन गडकरी यांची मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नागपूरला ४ हजार इंजेक्शन पाठवण्यात आली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदींकडे आज याबाबतची मागणी केली आहे.

महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. आताच्या तुलनेत राज्याला अधिक प्रमाणात रेमडेसिव्हीर उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे, परदेशातून रेमडेसिव्हीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किमीपर्यंत मागे हटले

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण, तर २७३ जणांचा मृत्यू

News Desk

राज्यात दुकाने सुरू ठेवण्यासाठी २ तास वाढवले

News Desk