HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही – अनिल देशमुख

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज घेतला आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

“मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम १७४ अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला.”

“या प्रकरणाचा विरोधी पक्षाचे नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे,” असे अनिल देशमुख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

News Desk

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Aprna

परिस्थिती काही करण्यास भाग पाडते

swarit