HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही – अनिल देशमुख

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (८ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात मुंबई पोलिसांची झालेली बदनामी यावरुन अनिल देशमुखांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?,असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्र्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपने केले. महाराष्ट्र् पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. भाजपनंे बदनाम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

“गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला जाणार का?, बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?, असं म्हणत गृहमंत्र्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे. AIMS आणि मुंबई स्थानिक रुग्णालयाचे रिपोर्ट बघितले तर त्यामध्ये वेगळं काही आढळले नाही. CBI तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला, तर सुशांत सिंह प्रकरणमधील तथ्य बाहेर येईल”, असेही ते म्हणाले आहेत.

“मिशिगन विद्यापीठ, अमेरिका यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, त्यात सुशांत सिंह प्रकरण हे उचलून धरलं असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे यांनी हे प्रकरण ताणून धरलेलं आहे. यानिमिताने महाराष्ट्र पोलिसाला बदनाम करण्याचं काम भाजपाने केलं आहे. मुंबई पोलिसांनीसुद्धा तपास योग्य दिशेनं केल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.ज्यांनी 5 वर्षे राज्याचं नेतृत्व केलं ते फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं म्हटलं आहे. त्यामुळे माझे त्यांना दोनच प्रश्न आहेत. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा; चंद्रकांत पाटलांचा संदेश

News Desk

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna

संचारबंदी लागू केली तरी नवी बंधने लादण्यात आलेली नाही, आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

News Desk