HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येणार? जयश्री पाटील उतरल्या मैदानात!

मुंबई | खंडणीच्या प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हाय कोर्ट ने राज्य सरकारची आणि अनिल देशमुकांची याचिका फेटाळून सीबीआयच्या बाजूने कौल दिला असून, अनिल देशमुख हे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. अनिल देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात जाण्या आधीच अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली आहे. याआधीही जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळे देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.

हाय कोर्ट ने याचिका नाकारली

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती जी आता कोर्टाने फेटाळली आहे. सीबीआयला त्यांची हमी काही दिवस कायम ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतरी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी केली. या विनंतीस सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विरोध दर्शवला.तसेच अनिल देशमुख यांनाही हायकोर्टाने दिलासा नाहीच दिला. सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार देत अनिल देशमुखांची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न गुंतलेला असल्याने सुप्रीम कोर्टात दाद मागता यावी यासाठी निर्णयाला काही दिवसांसाठी स्थगिती द्यावी’’, अशी विनंती अनिल देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केली आहे.

कोण आहेत जयश्री पाटील?

ईडीची पिडा टळावी यासाठी अनिल देशमुख उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात धावाधाव करत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अ‍ॅड. जयश्री पाटील यांचं नाव या प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातल्या आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan Exclusive | काश्मीरची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे !

swarit

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

News Desk

शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी

News Desk