HW News Marathi
महाराष्ट्र

“थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल”, अनिल परबांचा फडणवीसांना इशारा

मुंबई । राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढल्याने शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (१८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनेक मुद्द्यांवर बोलताना अनिल परब यांनी भाजपला इशारा दिला आहे. “थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल. सरकारला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही केलेली काम अधिवेशनात ठामपणे मांडू”, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

“बहुमत असताना घाबरणारं सरकार मी कधीच पाहिलं नाही”, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना अनिल परब म्हणाले की ,”थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल. सरकारला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही केलेली काम अधिवेशनात ठामपणे मांडू.” दरम्यान, यावेळी अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या १२ जागांची आठवण करुन दिली आहे. त्याचप्रमाणे, “विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरल्यानंतर राज्यपालांना काय कळवायचे ते कळवण्यात येईल”, असेही अनिल परब यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला मातोंडकर या शिवसैनिकच आहेत – संजय राऊत

News Desk

IAS ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

News Desk

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्ना दिल्याने संतोष बांगरांनी चक्क व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

Aprna