HW News Marathi
महाराष्ट्र

रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान !

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सध्या महाविकासआघाडी सरकारविरुद्ध पवित्रा हाती घेतला आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिचा भेटणे, राज्यपालांची भेट घेणे किंवा शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या नौदल अधिकाऱ्यांची घेतलेलाच भेट असो. या सगळ्यावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी रामदास आठवलेंना टोला लगावला आहे. रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान आहे. त्यामूळे जे उघडले आहे त्याला किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल परब यांनी पुढे म्हटलं की, ‘बेकादेशीर काम करणा-यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता ? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ का ?. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचं नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही.’

कंगनाची पर्सनॅलिटी स्प्लिस्ट पर्सनॅलिटी आहे. तिला डॉक्टरांची गरज आहे. हवंतर सेना डॉक्टरांची कुमक पाठवेल. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या. कंगना अॅक्टर आहे, तिला जे स्क्रिप्ट दिलं जातंय, त्यानुसार ती बोलत आहे अशी टीका देखील अनिल परब यांनी केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना काय बोलतात आणि कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अवलंबून नाही!

News Desk

नाशिकमध्ये सैन्य भरती ६३ जागांसाठी २० हजारहून अधिक तरुण

News Desk

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास डॉ नरेंद्र दाभोळकरांसारखा होऊ नये, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk