HW News Marathi
महाराष्ट्र

महिला राखीव प्रवर्गातून तृतीय पंथीय अंजली पाटील विजयी

जळगाव | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील ह्या तृथीयपंथी आहेत, म्हणून त्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात अंजली पाटील यांचा दणदणीत विजय झाला असल्याचे समोर आले आहे.

अंजली पाटील यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला राम राम!

News Desk

भाजप शिवसेना युती तुटल्याने आठवले नाराज, आरपीआय आता भाजप ला साथ देणार

News Desk

“हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

Aprna