HW News Marathi
महाराष्ट्र

हाथरस घटना म्हणजे फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या – अण्णा हजारे

अहमदनगर | उत्तर प्रदेश येथील हाथरसमधील सामूहिक बलात्कार केलेल्या पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कायदा, सुव्यवस्था अपुरी पडत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

निष्क्रीय सरकार आणि व्यवस्थेचे कान टोचण्यासाठी देशातली यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असल्याचं ते म्हणाले. ते म्हणाले की, “हाथरसमधील घटना देशासाठी शरमेची बाब आहे. देशात सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ते अपुरे पडत आहेत.”

बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणारे नराधम मानवतेसाठी कलंक असल्याचे ते म्हणाले. देशाच्या भव्य सांस्कृतिक वारशाचे उदाहरण देत त्यांनी भारताच्या ऋषीमुनींपासूनच्या परंपरांचा दाखला दिला. ते म्हणाले, “भारताची संस्कृती विश्वातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. देशात अशा प्रकारचे गुन्हे घडणे ही खूप चिंताजनक बाब आहे.”

उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी असल्याचं सांगत, ही फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या असल्याचेही ते म्हणाले. तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे भविष्यकाळात घडू नयेत म्हणून नराधमांना फासावर लटकावण्याची मागणीही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनला धक्का ! तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna

‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

News Desk