HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात आतापर्यंत ११ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, असे असले तरीही राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१ ऑक्टोबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १६ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल १६ हजार १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत तब्बल ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ५९ हजार ६ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ७८.८४% इतका आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस बांधवांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्याचे समजल्याने राज्यपाल व्यथित !

News Desk

जाणून घ्या…राज्य सरकारची खासगी कार्यालय अन् दुकानांसाठी नवीन नियमावली

News Desk

कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५९० वर पोहोचली

News Desk