HW News Marathi
महाराष्ट्र

गिरीश महाजनांमुळे अण्णा हजारेंचे उपोषण स्थगित

राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाज समाजसेवक अण्णा हजारे यांचे आज (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात उपोषणाला बसणार होते. परंतु अण्णाचे उपोषण रोखण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले होते. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती आणि स्वामीनाथन आयोग या विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी अण्णा मंगळवारी सकाळी १० उपोषणाला सुरुवात करणार होते.

 

महाजन आणि अण्ण यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. अण्णाची राज्याचे मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर अण्णांनी त्यांचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती आणि स्वामीनाथन आयोग या विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसणार होते. सहा महिने उलटल्यानंतरही जनलोकपालची अंमलबजावणी न झाल्यामुळे अण्णांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे!

News Desk

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

News Desk

विक्रमी वेळेत सावित्रीचा पूल तयार

News Desk
मनोरंजन

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit

मुंबई । आज महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात मौनव्रत धारण करत आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या एका बाजूला मौनव्रत धारण करून बसल्याचे पाहून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा जोर वाढला. आणि गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भारत माता की, जय, महात्मा गांधी अमर रहे, अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी घोषणा देत होते.

भाजपकडून सकाळी ग्रांट रोड येथील मनीभवन येथून एक रॅली काढण्यात आली होती. याची सुरुवात स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यापासून झाली होती. त्यात तावडे मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली पोहोचताच त्यात तावडे हे सहभागी झाले. या रॅलीचे जणू आपण सर्व नेतृत्व करत असल्याचा आव आणत त्यांनी समोर येऊन महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून अभिवादन केले, आणि लगेच बाजूला बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे लक्ष घालून घोषणाबाजी सुरू केली.

हा सर्व प्रकार गांधीजी यांच्या पुतळ्या शेजारी बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, शिक्षक आमदार विक्रम काळे हे तावडे यांच्या या घोषणाबाजीचा प्रकार शांतपणे पाहत होते. तोंडावर काळी पट्टी आणि त्यातही मौनव्रत असल्याने सत्ताधारी पक्षाचे विनोद तावडे हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करत असलेली स्टंटबाजी केवळ उघड्या डोळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहत होते.

Related posts

युवांना ‘अग्निपंख’ देणारे डॉ. कलाम

News Desk

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या ट्रेलरला हिरवा कंदील

News Desk