HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात मोदींविरुद्ध आंदोलन करणार

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांनी दिल्ली येथील रामलीला किंवा जंतर-मंतर मैदानात आंदोलनासाठी परवानगी देखील मागितली आहे.

अण्णा हजारे यांनी आपलं शेवटचं आंदोलन हे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं आहे. याआधी शेतकरी आंदोलनावर अण्णा हजारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याआधी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि नंतर खुद्द गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली होती. तसेच अण्णांनी शेतकरी आंदोलनात भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी घेतलेला आंदोलनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

  1. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. तसे पत्रही अण्णांनी केंद्र सरकारला पाठवले होते. यापूर्वी २१ डिसेंबरला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरची यात्रा ‘ही’ सर्वात प्राचीन यात्रा, मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

Gauri Tilekar

“सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही”, फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा

Aprna

“एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या”, तरुणाची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk