HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही”, फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा

मुंबई | सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केले आहे. राज्य सरकारने भोंग्यासंदर्भात आज (२५ एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला फडणवीस गैरहजर होते. सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात बोलातना फडणवीस म्हणाले, “भाजपच्या नेत्यांवर हल्ला केल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर मी बहिष्कार घातला आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

फडणवीस म्हणाले, “भाजपवर हल्ल्यामुळे आमची सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्रीच नाहीत, बैठक म्हणजे टाईमपास आहे. हनुमान चालिसा म्हटल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर मग आम्ही रोज म्हणू. राणा दाम्पत्याना अटक केल्यानंतर पाकिस्तानसोबत युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष केला जातो. महाविकासआघाडी भाजपच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. राज्य सरकार हिटलसारखे वाटत आहे. मोहित कंबोज यांच्यावर मॉबलिंचिंगसारखा हल्ला केला. सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही. महाराष्ट्रात आमची ताकत मोठी असून आम्ही जशास तसे उत्तर देऊ,” असा इसारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला.  

ठोकशाहीने वागणार तर सरकारला ठोकशाहीने उत्तर देऊ

मुंबईतील हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तर राज्यभरातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आदेशावर झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले, “ठोकशाहीने वागणार तर सरकारला ठोकशाहीने उत्तर देणार असून केरळ आणि बंगालमध्ये भाजपच्या नेत्यांचे खूप, तर आम्ही घाबरलो नाही. स्वत: ला थप्पड मारून करडणारे मविआचे नेते आहेत. आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी पोलखोल करणारच आहे, असेही त्यांनी सांगितले. 

फडणवीसांच्या पत्रकारपरिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • पवारांचा सरकार पाडण्याचा इतिहास संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि शरद पवारांनी अस्वथेवर बोलू नये, असा टोला फडणवीसांना लागवला
  • केरळ आणि बंगाल या दोन्ही राज्यात भाजप नेत्यांच्या हत्या झाली तरी देखील आम्ही घाबरलो नाही. 
  • कितीही हल्ले झाले तरी पोलखोल करणारच
  • पोलीस संरक्षण असताना सुद्धा भाजप नेत्यांवर हल्ला
  • स्वत: ला थप्पड मारून करडणारे मविआचे नेते आहेत
  • केरळ आणि बंगालमध्ये भाजपच्या नेत्यांचे खूप, तर आम्ही घाबरलो नाही
  • ठोकशाहीने वागणार तर सरकारला ठोकशाहीने उत्तर देणार
  • महाराष्ट्रात आमची ताकत मोठी असून आम्ही जशास तसे उत्तर देऊ 
  • मुंबईतील हल्ले हे मुख्यमत्र्यांच्या आदेशाने तर राज्यभरातील हल्ले हे गृहमंत्र्यांच्या आदेशान झाल्याचा फडणवीसांनाच गंभीर आरोप
  • महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपले आहे
  • राणा दाम्पत्याना तुरुंगात हिन दर्जाची वागणूक
  • सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही
  • मोहित कंबोज यांच्यावर मॉबलिंचिंगसारखा हल्ला केला 
  • राज्य सरकार हिटलसारखे वाटत आहे
  • महाविकासआघाडी भाजपच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे.
  • राणा दाम्पत्याना अटक केल्यानंतर पाकिस्तानसोबत युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष
  • हनुमान चालिसा म्हटल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर मग आम्ही रोज म्हणू
  • सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्रीच नाहीत, बैठक म्हणजे टाईमपास
  • भाजपवर हल्लायामुळे आमची सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk

काँग्रसने नोटबंदी विरोधात थाळीनाद आंदोलन

News Desk

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, अजित पवार यांची ग्वाही

Aprna