HW News Marathi
महाराष्ट्र

अण्णा हजारेंचा मोदी सरकाराला अखेरचा इशारा

नगर | लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी वारंवार विनंती करूनही जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना शेवटचा इशारा दिला आहे.

मला आंदोलनासाठी दिल्लीत जागा न उपलब्ध करून दिल्यास नाईलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल, असे अण्णांनी म्हटले आहे. अण्णा हजारे येत्या 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत.

मात्र, यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य पंतप्रधान मोदींनी दाखविलेले नाही. त्यामुळे अण्णांनी पंतप्रधान मोदींना अखेरचे पत्र पाठवून अंतिम इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांत मान्सूनची हजेरी

News Desk

महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन

News Desk

फडणवीस म्हणतात, शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे !

News Desk
राजकारण

राम मंदिर बांधण्यातील अडथळा नरेंद्र मोदीच | प्रवीण तोगडिया 

News Desk

नागपूर ।”अयोध्येत राम मंदिर बनवण्यामध्ये येणारा अडथळा नरेंद्र मोदीच आहेत,” असे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत. रविवारी (७ ऑक्टोबर ) संघभूमीत येऊन तोगडियांनी राष्ट्रीय स्वयंम संघ व नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. संघावर दबाव असल्यामुळे कुणीही राम मंदिराबाबत पुढाकार घेतला नाही. “माझ्यावर सुद्धा दबाब टाकण्यात येत आहे,” अशा प्रकारचा आरोप तोगडिया यांनी मोदींवर केला.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून २१ ऑक्टोबरला लखनौ ते अयोध्येपर्यंत शांतिपूर्व यात्रा काढण्यात येणार आहे. देशातून वेगवेगळ्या भागातून रामभक्त या यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रवीण तोगडिया या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. “३२ वर्षांपासून संसदेत कायदा तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघच महत्त्वाची भूमिका आहे. तरीही राम मंदिराबाबत निर्णय घेता येत नाही. संघाने लवकरात लवकर संसदेत कायदा तयार करण्याचे आदेश द्यावे”, असे ही तोगडिया यांनी सांगितले आहे.

प्रवीण तोगडियांनी म्हणाले की, “शिवसेनेचे आम्ही समर्थन करू तसेच शिवसेनेवर हिंदूंनाही पूर्ण विश्वास आहे. पक्षप्रमुखांनी राम मंदिर उभारण्या बाबत ठोस भूमिका घ्यावी अयोध्येकडे कूच करावे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.”

Related posts

राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही ?

News Desk

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

News Desk