HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती, जरंडेश्वरमध्ये घोटाळा, सोमय्यांचा आरोप!


मुंबई। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाराचे आरोप केले आहेत. अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीमध्ये घोटाळा केला आहे. जरंडेश्वरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या बहिणी मालक, भागधारक आहेत. बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती जमवली आहे. आयकर विभागाचे छापेमारी त्याच संदर्भात सुरु असून अजित पवारांनीच आता सांगावे की, बहिणींच्या घरी धाडी का टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या बहिणीचे पती मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. पवार कुटुंबीयांच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अजित पवारांनी स्वतःच कारखान्याची विक्री केली आणि लिलाव करुन स्वतःच विकत घेतला

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. सोमय्यांनी म्हटलं आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे की, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीमध्ये घोटाळा झाला आहे. याची चौकशी झाली पाहिजे असे निर्देश महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिली. अजित पवारांनी जरंडेश्वर कारखाना घेतला तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. या तीन आणि राज्य सरकारचे पैसेही त्यात घालण्यात आले. अजित पवारांनी स्वतःच कारखान्याची विक्री केली आणि लिलाव करुन स्वतःच विकत घेतला अशा प्रकारे उल्लंघन केले. नियमांचे उल्लंघन करुन त्यांनी स्वतःच बेनामी पद्धतीने कारखाना घेतला त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे भाजप आणि केंद्र सरकारचे हीन दर्जाचे राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयकर विभागाच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली होती की, माझ्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे भाजप आणि केंद्र सरकारचे हीन दर्जाचे राजकारण आहे. परंतु अजित पवार जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक आहेत. जरंडेश्वरमधील भागधारकांमध्ये पहिले नाव मोहन पाटील आहे. ते विजया पाटील यांचे पती आहेत. निता पाटील यांचे नाव आहे. ही सर्व मंडळी अजित पवारांच्या बहिणी आहेत. तसेच मोहन पाटील हे बहिणीचे पती आहेत. अजित पवारांनी आता स्वतःच सांगावे की बहिणींच्या घरी धडी का टाकल्या? यामागील खरं खोटं पवारांनी सांगावं असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

बेनामी कंपन्या असून यांची मूळ कंपनी कल्पक

अजित पवारांच्या बहिणींचा संबंध नाही तर त्यांच्या घरी छापेमारी करण्यात का आली हे जनतेला अजित पवारांनी सांगावे असे सोमय्यांनी म्हटलं आहे. बहिणींचा संबंध नाही म्हणतात परंतु त्यांच्या बहिणी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालक आहेत. भागधारक आहेत. अजित पवारांची बहिणीच्या नावे बेनामी संपत्ती आहे. विजया पाटील, मोहन पाटील आणि निता पाटील यांच्या नावे अनेक बेनामी कंपन्या असून यांची मूळ कंपनी कल्पक वृक्ष प्रा. लि या कंपनीचाही संबंध आहे.राज्यातील ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगल्यांची संपत्ती उभी करु शकतात तर पवार काहीही करु शकतात असे सोमय्या यांनी म्हटलं आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये ९०.५ टक्के शेअर आहेत. एकूण २७ जणांचा लेअर करण्यात आला आहे. ९०.५ टक्के शेअर हे स्पार्कलिंग सॉईल कंपनीचे आहेत. या कंपनीचे मालक संचालक या सुनेत्रा पवार आणि अजित अनंतरराव पवार आहेत. याला म्हणतात परिवार असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.

३ मंत्र्यांनी या कंपन्यांच्या आधारे काळा पैसा सफेद केला

सोमय्यांनी अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचे सांगितले आहे. एस व्ही ज्वेल ही कंपनी शेल कंपनी आहे. २३ एप्रिल २००९ रोजी सेबीने प्रतिबंधीत केलेली ही बोगस कंपनी आहे. ठाकरे सरकारच्या ३ मंत्र्यांनी या कंपन्यांच्या आधारे काळा पैसा सफेद केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे पवार सरकार घोटाळेबाज सरकार आहे. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणे हे आमचं लक्ष्य असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.अजित पवारांचे अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार आहेत. एस व्ही ज्वेल ही शेल कंपनी आहे. २३ एप्रिल २००९ रोजी सेबीने प्रतिबंधीत केलेली बोगस कंपनी आहे. ठाकरे सरकारचे ३ मंत्री नेत्यांचे आर्थिक गैरव्यवहाराचे अहवाल आले आहेत. यामध्ये काळ्याचे पांढरे पैसे करण्यात आले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जांब समर्थ’ राम मंदिरातून समर्थ रामदासांनी स्थापित केलेली मूर्ती चोरीला

Aprna

राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे – सामना

News Desk

#CoronaVirus : मुंबईची लोकल-बस सेवा बंद करणार नाही,नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा !

swarit