HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

नवी मुंबई | देशात लॉकडाऊन जरी असला तरी नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा या खंड न पडता सरकार पुरवत आहे. दरम्यान, वाशीतील ए.पी.एम.सी मार्केट बुधवारपासून (१५ एप्रिल) सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने शनिवारपासून (११ एप्रिल) मार्केट बंद ठेवण्यात आले होते. पण ए.पी.एम.सी व्यवस्थापनाने माथाडी कामगार, व्यापारी तसेच, वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी केलेली चर्चा यशस्वी झाली असून मुंबई, ठाणे, वाशीतील भाजीपाल्याचा परवठा सपळीत होण्यासाठी १५ एप्रिलपासून खरेदी-विक्री सुरु होणार आहे.

दरम्यान, आज पार पडलेल्या बैठकीत संजीव जयस्वाल, कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, सहसचिव अविनाश देशपांडे, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, एपीएमसीच्या धान्य मार्केटचे संचालक निलेश वीरा आदी उपस्थित होते. या बैठकीत मार्केट सुरू करण्यासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एपीएमसी प्रशासनाने मार्केट चालू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Aprna

“शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली”, चंद्रकांत पाटलांचा अनिल परबांना इशारा!

News Desk

मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावे, विनायक मेटेंची विनंती 

News Desk