HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

सांगली। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीवर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन आमदार खोत यांनी ही टीका केली.

केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली

इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असं सांगितलं होतं. केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता असं केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांच्या या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवणार

पहिल्यांदा ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा. मगच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल. मात्र, तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवणार. मराठा समाज मागासलेला कसा आहे, याचा डेटा गोळा करावे लागले आणि तो मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून गोळा करावा लागेल. पण हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार. तसंच तुम्ही केंद्रात आणि राज्यात साठ वर्षात सत्तेत होता, मग तेव्हा घटनादुरुस्ती का केली नाही? तुमचे हात कोणी बांधले होते का?

राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार

शरद पवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही कधीतरी खरं बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात? तसेच तुमची राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केलीय. 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिला नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात फेटाळला गेला. मात्र आता घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्हा आता परत केंद्राकडे का बोट दाखवता? अशी विचारणा देखील सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“घाव वर्मी बसला”, सामना अग्रलेखावरुन फडणवीसांचा पलटवार  

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद’, काय मोठी घोषणा करतील!

News Desk

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न! – उपमुख्यमंत्री

Aprna