HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामींना आजही मुंबई हाय दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जवरील सुनावणी आता उद्या दुपारी पार पडणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज बराच युक्तीवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी उद्या (७ नोव्हेंबर)दुपारी १२ वाजता घेणार असल्याचं सांगितलं.

वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी साल 2018 मध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अलिबाग दंडाधिकारी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी आधीच आपला ‘ए’ समरी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपीच्या कस्टडीची गरज नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात परतीच्या पावसाने घातला धुमाकूळ! हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी 

News Desk

शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरून बीडमध्ये राडा!

News Desk

नितिन गडकरी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची का घेतली भेट?

News Desk