HW News Marathi
महाराष्ट्र

“बाळासाहेबांबद्दल किती आदर आहे हे आलं समोर”,  शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा 

मुंबई। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या वादावरून आता वेगवेगळे मतभेद असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. “नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील उडी घेतलीये नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा राज ठाकरे यांचा केवळ तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

तर राज ठाकरे यांचा हा केवळ तर्क आहे. नवी मुंबईचं विमानतळ खरं तर नवीन आहे. हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा अर्थ त्यांनी काढलाय, असं अरविंद सावंत म्हणालेत. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे देखील समोर आलंय, हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं सावंत यांनी नमूद केलय.

राज ठाकरे काय म्हणाले?

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर काही स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दि.बा. पाटील असं नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर ते सहारपर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव द्यावं असं मला वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार?. आता बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. मुळात नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरेंनी खडसावून सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यावर ईडीला सामोरं जाणार- अनिल देशमुख

News Desk

“महिलांवरील अत्याचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित केल्यास मोठ्ठा बदल घडू शकेल” – अ‍ॅड रमा सरोदे

News Desk

आर्यन खान डील प्रकरणात समीर वानखेडेंचा संबंध?; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा खुलासा

News Desk