HW News Marathi
महाराष्ट्र

पत्रकार अर्णब गोस्वामींवर तातडीने कारवाई करण्यासाठी अरविंद सावंतांचे गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई | पत्रकार तसेच, रिपब्लिक टिव्ही इंग्रजी आणि रिपल्बिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात लाईव्ह कार्यक्रमात धमकी देत त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेक टिका झाल्या तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागण्याचे करण्यात आल्या.

अशातच आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. यात त्यांनी अर्णब गोस्वामींची कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत मजल गेली आहे. या पुर्वीच बातम्या प्रसारित करताना राजकीय नेत्यांवर खासकरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वाईट शब्दांत आरोप केले होते. त्यामूळे उभा महाराष्ट्र अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी विनंती या पत्रातून खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk

मुंबईच्या ब्लॅकआऊटमागे चीनचा सायबर हल्ला, देशाला अंधारात टाकण्याचा चीनचा कट होता!

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

News Desk