HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

मुंबई। बॉलिवुड किंग खानच्या मुलाला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गुरूवारी जामीन मिळाला. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात सविस्तर अटी शर्थीसह जामीनाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केला. पण जामीनासाठीची औपचारिकता शुक्रवारी पुर्ण न झाल्याने आर्यनला शुक्रवारची रात्र आर्थर रोड कारागृहातच काढावी लागली. जामीनाची पेटी सकाळी ५.३० वाजता उघडल्यानंतर अखेर आर्यन खानचा जामीन अर्ज तुरूंग अधिक्षकांकडे पोहचला. जामीन अर्जावरील संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानेच सकाळी ११ वाजताच्या सुमारास आर्यनला आर्थर रोडमधून सोडण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच शाहरूख खानचा बॉडीगार्ड सकाळी १०.२७ वाजता आर्यन खानच्या जामीनानंतरच्या पुढच्या प्रक्रियेसाठी हजर झाला. याठिकाणी शाहरूख खान स्वतः हजर न राहता त्याचा अंगरक्षकच आर्यनला घेण्यासाठी याठिकाणी आला. शाहरूख खान मात्र वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती काही टेलिव्हिजन चॅनेल्सने दिली होती. सकाळपासूनच शाहरूख खान आपल्या कायदेशीर टीमसोबत याठिकाणी हजर असल्याचे वृत्त काही चॅनेल्सने दाखवले होते. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान आर्थर रोड जेलमधून आज बाहेर पडला.

७ अटींवर आर्यनला मिळाला जामीन

१) आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.

२) पुराव्याशी छेडछाड करणार नाही.

३) आपला पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करा.

४) प्रसारमाध्यमांमध्ये भाषणबाजी करणार नाही.

५) न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.

६) एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करेल.

७)यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कुणी कुणाला जोडे मारायचे आणि कुणी कुणाला…”,फडणवीसांची त्या लेटरवर पहिली प्रतिक्रिया

News Desk

निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?

News Desk

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

News Desk