HW News Marathi
महाराष्ट्र

….म्हणून एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सवलती बंद

मुंबई | एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन २५ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवाला विरोधात आंदोलन केले होते. एसटी महामंडळाच्या विभागीय आणि आगार कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात एसटीतून निवृत्त झालेले काही कर्मचारी देखील यात भागी झाले होते. या कर्मचाऱ्यांना निवृत्तनंतर देण्यात येणाऱ्या मोफत प्रवास सवलत तातडीने बंद करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून या दरम्यान उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने न्यायालयात सादर केलेल्या वेतनवाढीचा अहवाल अमान्य असल्यामुळे एसटी कामगार संघटनानी आंदोलन करुन यांचा निषेश व्यक्त केला होता. या आंदोलनात एसटी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सहभागी झाल्याचे एसटी प्रशासनाच्या लक्षात आले.

सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांनी एसटी विरोधात आंदोलनात सहभागी होऊन एसटीची प्रतिमा मालिन करणे अयोग्य आहे. त्यामुळे या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोफत सवलती बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार!

News Desk

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने थेट मनसे नेत्यांसोबत केलं आंदोलन! नेमकं काय झालं?

News Desk
मुंबई

विमानातून साडेचार कोटीचे सोने जप्त

News Desk

मुंबई | विमानतळावर विमानाच्या सीटखाली जवळपास साडेचार कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय)नी शनिवारी ही कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात डीआरआयने तीन संशयित प्रवाशांना अटक केले आहे. या तिघांनी आपल्यावरील गुन्हा कबूल केला असून हे सोने लपवण्यासाठी त्यांना पैशाचे आमिश देणयात दिले होते.

इमरान तजनीम, फरहद शेख आणि धर्मेश सोनी असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशांचे नाव आहे. मोहम्मद नावाच्या वक्तीने त्यांना दुबईमध्ये हे सोने दिले होते. तसेच भारतात जेव्हा हे विमान येईल तेव्हा एक व्यक्ती येऊन ते सोने घेऊन जाईल अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींनीकडून माहिती मिळाली आहे.

तसेच हे सोने नेमके कोण आणि कुठे घेऊन जाणार यांची माहिती आरोपींना नव्हती. सोने दिलेल्या व्यक्तीशी निगडीत कोणी तरी या विमानातून मुंबईपर्यत प्रवास करणार असल्याचा संशय डीआरआय अधिकाऱ्यांना होता. हे विमान मुंबईतून अहमदाबाला जाणार होते. सोनी आणि शेख मुंबईतील रहिवासी तर इमरान दिल्लीत राहणार आहे.

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

कामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा!: विखे पाटील

News Desk

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

News Desk