HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर शेलारांचा माफीनामा

मुंबई | “नागरिकत्व संशोधन कायदा लागू न करायला हे राज्य का तुमच्या बापाचे आहे का?,” अशी जहरी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शेलारांच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. यानंतर शेलारांनी आज (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले की, “मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो.”

“मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो. पण सवाल आमचा जो आहे, तो स्पष्ट आहे, अफजल गुरुची बरसी मनवणारे, संविधानाचा अपमान करणारे, भारत तेरे तुकडे तुकडे म्हणणारे, शरजीलच्या समर्थनार्थ जाणारे, या सर्वांच्या मागे जो जो राजकीय पक्ष राहील, तो संविधानाच्या विरोधात उभा आहे. त्याला आम्ही खडे सवाल करत राहू”, असे आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार नेमके काय म्हणाले

आशिष शेलार बोलताना म्हणाले की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की, रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर सीएए हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे?, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी टीका केली. हा केंद्राचा काय आहे. जरा अॅडवकेट जनरलचे ओपिनियन घ्या. माहित नसेल तर अभ्यास करा?, नसेल करता येत तर माझ्यासारखे वकिल खूप आहेत, असा खोचक सल्ला देखील शेलारांनी मुख्यमंत्र्यांना दिला. पण, हा कायदा लागू करता येणार नाही, ही भूमिकाच मांडता येऊ शकत नाही,” अशी टीका शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk

“जागा आणि वेळ तुम्ही ठरवा मी येते…”उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला आव्हान 

News Desk

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk