HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाचा ‘कोल्ड ब्लडेड खून’ ! शेलारांचा घणाघाती आरोप

मुंबई । मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ह्या मुद्द्यावरून दरदिवशी जुंपत आहे. भाजपकडून महाविकासआघाडी सरकारवर अत्यंत बोचरे आरोप आणि टीका होत आहेत. आता पुन्हा एकदा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “ज्या पध्दतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची पूर्व आणि पूर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असला तरी दिसत नाही. तशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना यांनी मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला,” असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार आज (२ जून) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते सध्या महाराष्ट्र दौरा करीत आहेत. आशिष शेलार देखील हा दौरा करत आहेत. आशिष शेलार यावेळी म्हणाले की, “वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या त्या शिफारशी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समिती आली. खरंतर आयोगाची गरज होती पण समिती नेमली. अशा प्रकारे एक एक करत मराठा समाजाच्या हिताचा खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकार मधील पक्षांनी केले. आज हीच लोकं भाजपला शिकवण्याचे काम करीत आहेत. आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या,” असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

ठाकरे सरकार इंग्रजांप्रमाणे समाजासमाजात तेढ वाढविण्याचे काम करत आहे !

आशिष शेलार यांनी याबाबत पुढे बोलताना म्हटले की, “ठाकरे सरकारने EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण

ठाकरे सरकारने दिले. त्यात तुमचे कर्तृत्व काय? आजपर्यंत मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती आता कर्तृत्व शून्यतापण दिसली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही १५ महिने काहीच न केल्याने ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचे ही मोठे नुकसान केले. समाजासमाजात तेढ आणि भांडणे लावण्याचे काम इंग्रजांप्रमाणे ठाकरे सरकार करते आहे”, असाही गंभीर आरोप यावेळी शेलार यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज नव्या ५,३१८ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

पुण्यात २ स्वयंसेवकांना दिला ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस 

News Desk

देशातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी टाटा ग्रुपचा पुढाकार, पंतप्रधानांनी केलं कौतुक

News Desk