HW News Marathi
महाराष्ट्र

‘सरकार दाऊदची गँग चालवताय का’? आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | भाजपचे आमदार आशिष शेलार हे विरोधी पक्षावर नेहमीच निशाण साधून असतात. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?

आशिष शेलारांनी लागोपाठ ३ ट्विट करत राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. न्यायालयाचे आदेशही मानत नाही. देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी सरकारवर चढवला आहे.

अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत

भाजप आमदार आशिष शेलार नियोजित दौऱ्यावर असल्यामुळे या महानगरपालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनाला उपस्थिती राहू शकले नाही. मात्र एक व्हिडिओ ट्विट करत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची फसगत करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पण हे कार्यालय वापरामध्ये ३ महिन्यांपुर्वीच आले आहे. जे कार्यरत सेवेत कार्यालय आहे. त्या कार्लायलाचं कार्यक्रमाच उद्घाटन करुन सेवेत कार्यरत करण्याचे कारण काय आणि त्याच्या मागचा अट्टहास काय आणि मग विषय अट्टहासाचा आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये बसलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत असा माझा अट्टहास असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

News Desk

एक देश एक निवडणूक भारतात अशक्य | राऊत

News Desk

लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकतं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय – संजय राऊत

News Desk