HW News Marathi
महाराष्ट्र

‘पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी’, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

धुळे | राज्य सरकारने काल(३ ऑगस्ट) पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. या घोषणेनंतर राज्य सरकार आता विरोधकणांच्या टिकच्या कचाट्यात सापडले आहेत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितले होतं. मात्र, त्यांनी पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’

भाजप आमदार आशिष शेलार हे नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करत असतात. राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी खास अहिराणी भाषेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. काल(३ ऑगस्ट) नंदुरबारमधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली

राज्य सरकारने मदत जाहीर केल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुनर्बांधणीचे ३००० कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ७००० कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल’, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC च्या सर्व शाळेत भगवत गीतेचे पठण करण्याची भाजपच्या नगसेविकेची महापौरांकडे पत्रद्वारे मागणी

Aprna

‘केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं!’ भाजपचं सामन्यावर प्रत्युत्तर

News Desk

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत उपमुख्यमंत्र्यांकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अभिवादन

News Desk