HW News Marathi
महाराष्ट्र

BMC च्या सर्व शाळेत भगवत गीतेचे पठण करण्याची भाजपच्या नगसेविकेची महापौरांकडे पत्रद्वारे मागणी

मुंबई | बीएमसीच्या सर्व शाळेत भगवतगीतेचे पठण करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात कोळींनी महापौरांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. शाळेत भगवत गीतीचे पठण झाल्याने भावी पिढीवर चांगले संस्कार होईल, असे त्यांनी त्यांच्या पत्रात नमुद केले आहे. आता बीएमसीचे निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेत भगवतगीतेच पठण करण्याच्या मागणी केल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. 

योगिता कोळींनी पत्रात म्हटले, “भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.

महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिकेचे असे ठाम मत आहे कि, बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk

झोटिंग समितीच्या गहाळ अहवालावरून उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत भाजप नेत्याची अवहेलना

News Desk