HW News Marathi
महाराष्ट्र

रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घ्या

मुंबई | रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला कायद्याने मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे करावी अशी सूचना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी. विधानसभेत केली ती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केली.

राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाई बाबत तारांकित प्रश्न आज विधानसभे चर्चेला आला असताना आमदार अँड आशिष शेलार यांनी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. रांजणगाव येथे एका बंद कारखान्यात 132 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार होऊन त्यातील 112 किलो ड्रग्जची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी 22 आरोपींना अटक केली. पण सदर कंपनी सील करण्याचे अधिकार राज्याच्या कायद्याने राज्याला नाहीत.

त्यामुळे केंद्र सरकारला विनंती करुन अशा रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळावेत असे प्रयत्न राज्याने करावे, अशी सूचना आमदार. आशिष शेलार यांनी केली. तसेच वांद्रे परिसरात अशा ड्रग्जचे अनेक अड्डे असून त्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत लवकरच एक ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk

“वाझे लादेन आहे म्हणणाऱ्या मुख्मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, निलेश राणेंची मागणी

News Desk

“यात्रा, जत्रा कधी सुरू होणार?” अमित देशमुखांचं विधान!

News Desk