HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय!

सिंधुदुर्ग | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिधुदुर्ग दौऱ्यानंंतर भाजपला कोकणात मोठा धक्का बसला आहे. वैभववाडीत भाजपच्या सात नगरसेवकांनी तडकीफड राजीनामा दिला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन राजकारण तापण्याची मोठी शक्यता आहे.

नवी मुंबई आणि कोकणात भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यासोबत गेलेले नगरसेवक पश्चातापवतील असंही शेलार यांनी म्हटलं आहे. ज्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा कमी होती किंवा नव्हती आणि समोर सत्तेत असलेल्या शिवसेनेने सत्तेचा दुरूपयोग केला असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.दरम्यान, आशिष शेलारांच्या या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लुधियाना न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट; २ जणांचा मृत्यू

Aprna

“स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आलाय”   

News Desk

‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’, संजय राठोड यांची सगळ्यांना हात जोडून विनंती

News Desk