HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’, सेना भवनासमोरील राड्यावरुन शेलारांचा घणाघात

मुंबई | मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली आहे. माहीम पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणं. शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे.

यावेळी शेलार म्हणाले की, “ज्यावेळी सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा आपले देव बनतात, त्यावेळी तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे दुष्मन शिवसेनेचे होतात. हे आज या ठिकाणी दिसलं आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. लपून पोलिसांच्या आड राहून हल्ले कसले करता? रणांगणात समोर या, भाजपा तुम्हाला चारही मुंड्या चीत करायलाय तयार आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. एक महिला कार्यकर्ती अक्षता तेंडुलकर नावाची तिच्यावर सर्वांनी मिळून हल्ला करणं, शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. याचं उत्तर … हिंदीत एक म्हण आहे, लातो के भूत बातो से नही मानते.. इसके आगे बातोंसे नही चलेंगे उनको उनकी भाषां मैही जवाब देंगे..”

“मी व मंगलप्रभात लोढा आम्ही सगळेजण पोलिसांना भेटलो आहोत. पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं ही अपेक्षा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे. आज पोलीस आम्हाला म्हणाले आहेत की, गुन्हा दाखल करत आहोत. तो गुन्हा दाखल केला नाही. तर हे आंदोलन अजून वाढेल, पोलिसांनी तसं आश्वासीत आम्हाला केलं आहे. पण आम्हाला अजूनही एक कारण कळत नाही की, राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेच्या पोटात काय दुखतं आहे? देखो दिवानो ऐसा काम न करो, राम का नाम बदनाम ना करो”.

“शिवसेना पहिल्या दिवसापासून राम मंदिराच्या विषयात…पहिलं मंदिर नंतर सरकार म्हणाले, मात्र मंदिर विसरले. त्यानंतर समर्पण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम आम्ही केला. त्याला लोकवर्गणी करून बदनाम करण्याचे अग्रलेख त्यांनी लिहिले आणि आज ज्या समर्पण निधीतून, पारदर्शक पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यावेळी राम मंदिराच्या निर्मितीला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. रामाला बदनाम करण्याचं व राम मंदिराला बदनाम करण्याचं षडयंत्र ही लोकं जे करत आहेत, हे पाप जनतेने पाहिलं आहे”.

नेमकं काय झालं?

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

News Desk

‘हिमालयीन गिफ्रॉन’ प्रजातीच्या गिधाडाची अखेर सुटका

Gauri Tilekar