HW News Marathi
महाराष्ट्र

चर्चेची वेळ मिळावी म्हणुन आंदोलन होत का ? भाजपची संभाजीराजेंच्या आंदोलनावर टिका!

मुंबई | खासदार संभाजी छत्रपती यांनी काढलेल्या मराठा मूक मोर्चावर भाजपाने आता टीका करायला सुरुवात केलीये. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे माध्यमांशी बोलताना हा सवाल दरेकरांनी केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी सन्मानच केलाय.सर्वच नेत्यांनी आपापल्या भूमिका या आंदोलस्थळी मांडल्या आहेत. पण या आंदोलनात भूमिका मांडून मार्ग निघाला का? मुळात प्रत्यक्षात मार्ग काढण्यासाठीचं ते व्यासपीठ नव्हतंच, अस दरेकर म्हणालेत.

तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आंदोलनस्थळी आले असते तर मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घेऊ शकले असते. मात्र आंदोलनाची सुरुवात म्हणून याविषयी संवाद झाला यातून काय साध्य होत आहे? मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देणार आहे मग केवळ चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का असा प्रश्न देखील दरेकर यांनी उपस्थित केलाय.

दरेकर पुढे म्हणाले की, आरक्षणासाठी जे करणं महत्त्वाच आहे, ते न करता केंद्र सरकारने आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणी करुन याला काही अर्थ नाही. हे सगळं इतकं सोपं असतं तर देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही केंद्र सरकार कडे जाऊन एका मिनिटात आरक्षण आणलं असतं, वर वर बोलून केंद्रावर सर्व ढकलण्याचा प्रयत्न हा सुरु असून ते योग्य नाही असा देखील टोला दरेकर यांनी लगावला..

सर्वच मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत सर्व पक्षाच्या आमदार लोकप्रतिनिधी आजी-माजी मंत्री मराठा समाजासाठी उभी आहेत ही तर जमेची बाजू आहे जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन तर होईल मात्र यातून काय आऊटपूट काय साध्य होईल आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री स्तरावर सरकारी स्तरावर होईल आणि त्यावेळी केंद्राने काही केलं नाही तर आपण देखील बोलू शकतो पण जी गोष्ट केंद्राकडे गेलीच नाही जो बॉल केंद्राच्या कोर्टात नाही, तरीही त्याला केंद्राकडे बोट दाखवत बोलायचं असेल तर अशा गोष्टींमधून राजकारणाचा वास येत आहे का? अशीदेखील प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीची गरज आहे, हे सांगण्यासाठी आंदोलन केलं होतं का या सर्व गोष्टी तर सर्वांना माहित आहे असेदेखील दरेकर म्हणालेत.. मराठा समाजाच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जे निर्णय घेतले होते, ज्या तरतुदी केल्या होत्या तशाच प्रकारचा निर्णय हा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत घेतला पाहिजे त्यासाठी कोणत्याही टेक्नॉलॉजी किंवा विज्ञानाची गरज नाहीये अशी खोचक टीकाही केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

News Desk

औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तर सात वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

News Desk

राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपचे ‘हे’ नेते दिल्लीच्या दिशेने रवाना

Aprna