HW News Marathi
महाराष्ट्र

आमचा सिनेमा सुदैवाने बरा चालला आहे!

नांदेड | महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल अनेक चर्चा होत असतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक वक्तव्य करत गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे? असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असं विधान नांदेडमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी अशोक चव्हाणांनी केले.

या आधीही महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला या वक्तव्यावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चव्हाणांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत टीका ओढवून घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (सरकार सत्तेत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू असतानाच आणखी एका विधानाची यात भर पडली आहे. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेत, सेनेने जर घटनाबाह्य काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

“राजकारण असो की चित्रपट-नाट्य क्षेत्र असो हे तीनही क्षेत्र सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा! – मुख्यमंत्री

Aprna

“अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत”, राज ठाकरे आक्रमक

News Desk

नारायण राणेंवर सामना मधून संजय राऊतांचा प्रहार!

News Desk