HW News Marathi
महाराष्ट्र

नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली – अशोक चव्हाण

नांदेड | राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर घोषणा करायला नको होती. याबाबत त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केल्याची अप्रत्यक्ष कबुली अशोक चव्हाण यांनी दिली आहे. महाविकास अघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या खात्यांना निधीच दिला जात नाही, अशी तक्रार सतत केली जात आहे. वीज बिलात सवलतीची घोषणा करुनही काँग्रेसकडे असलेल्या ऊर्जा खात्याला निधी मिळाला नसल्याचे विचारल्यानंतर त्यांनी हे विधान केले.

नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके कुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर दोन टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचे सोंग आणता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे गडकिल्ले आणि कॅम्पस प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यास सज्ज

swarit

सांगली जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाला आक्रमक रूप

News Desk

ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती! – उपमुख्यमंत्री

Aprna