HW News Marathi
महाराष्ट्र

विश्व हिंदु परिषदेच्या लोकांनी आंदोलने करण्यापेक्षा प्लाझ्मा दान करावे – अस्लम शेख

मुंबई | कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्यासाठी राज्यभरातून आंदोलने केली जात आहेत. विश्व हिंदू परिषदेनेदेखील मोर्च्याचे आयोजन केले आहे. यावरून वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सध्याच्या काळात स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का? यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं, असे मत अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला आहे. लवकरच धार्मिक स्थळं उघडण्यात येतील. महाविकास आघाडी सरकार या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली तयार करूनच हा निर्णय घेईल, असेही अस्लम शेख म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार लवकरच धार्मिक स्थळं उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली आखेल. त्यानंतर महाराष्ट्रातली धार्मिक स्थळं उघडण्यात येतील, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”, विनायक राऊतांची संतप्त भावना

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

Aprna

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?

News Desk