HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?

मुंबई | शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली आहे. अटक केलेल्या शिवसैनिकांना जामीन मिळाला होता. मात्र, पुन्हा या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र , यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, आज मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

सरकारने विवेक बुद्धी गहाण ठेवली आहे का? हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण – विजय वडेट्टीवार

News Desk

टोपेंची मोठी घोषणा, कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना देणार पुरस्कार!

News Desk

जाणून घ्या…मकरसंक्रांतीच्या सणाची कथा

News Desk