HW News Marathi
महाराष्ट्र

जो न्याय अर्णब गोस्वामींना लावला होता, आता तोच न्याय अनिल परबांना लावणार काय? अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई | एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आज दुर्दैवी आत्महत्या केली असून आपल्या मृत्यूला ठाकरे सरकारचं जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. ही अत्यंत हृदय द्रावक घटना असून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा व मनोज चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर व गाड्यांवर करोडो रुपये खर्च करायचा, अनावश्यक विषयांत वकिलांना करोडो रुपये फी द्यायची पण दुसरीकडे कोरोनाचे कारण पुढे करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवण्याचे पाप ठाकरे सरकार करत आहे. या विषयी वारंवार करण्यात आलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करून एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे महापाप ठाकरे सरकार करीत असल्याचा आरोप सुद्धा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण यांना पाहिलात का?

News Desk

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

News Desk

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

swarit