HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : “अग्रलेख लिहिणारे आता गप्प का?”, अतुल भातखळकर यांचा राऊतांना सवाल

मुंबई | मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आता कुठे गेलेत?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. ज्या संजय राऊतांनी एम.जे. अकबरांवर आरोप झाले तेव्हा अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत. हा त्यांचा दुतोंडीपणा आहे, अशी घणाघाची टीका करत राऊतांनी या प्रकरणावर बोलायला हवे” असं भातखळकर म्हणाले आहेत.

राज्यातील अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत आहे. मागील महिनाभरापूर्वी एका मंत्र्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला. आता महिना उलटत नाही तोपर्यंतच दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होतोय. या राज्यात बदमाशांचं सरकार कार्यरत आहे, असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

Aprna

मुंबईत पेट्रोलने गाठली शंभरी, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

News Desk

राफेलचे ताफ्यात सामील होणे गेमचेंजर ठरणार नाही – शरद पवार

News Desk