HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

मुंबई | शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आजच्या (२७ डिसेंबर) रोखठोक या सदरातून केंद्र सरकार आणि मोदी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. मोदी यांच्यावर जी टीका केली आहे. यावर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“सामनाचे कार्यकारी संपादक बोलू बहाद्दर संजय राऊत यांनी आज आपल्या अकलेचे तारे रोखठोकमधून तोडले आहेत. देशामध्ये विभाजन प्रवृत्ती वाढत आहे आणि रशियासारखी राज्य फुटून निघतील अशी देशद्रोही वक्तव्ये त्यांनी आपल्या लेखातून आज केले आहे. त्यांना इतकही भान नाही की राज्य फुटली ती रशियातून नव्हे तर सोवियेत युनियनमधून पण ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार”, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna

राष्ट्रवादीची पहिल यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना पुन्हा संधी

News Desk

#Coronavirus : पुण्यात आज ८० नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जण कोरोनामुक्त

News Desk