HW News Marathi
Covid-19

औरंगाबादजवळ मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल सेवा बंद असली तरी मजुरांना आणि श्रमिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच, मालगाडी देखील सुरू आहे. याच मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू आजन(८ मे) पहाटे औरंगाबाद जवळ झाला.
बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असताना मालगाडी वरून गेल्याने १६ जणांना जीवाला मुकावे लागले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेहण्यात आले आहे. रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा एकदा १५ हजारांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली बैठक, लॉकडाऊन की कडक निर्बंध?

News Desk

सचिन तेंडुलकरनंतर आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण

News Desk