HW News Marathi
राजकारण

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

नवी दिल्ली | औरंगाबाद येथे आज (८ मे) पहाटे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाला. या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या १६ मजुरांचा मालगाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर, काही मजूर जखमी झाले आहेत. हे मजूर कर्माजवळ रेल्वे रुळावर झोपले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आपण या दुर्घटनेबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून त्यांना तेथील स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पीडितांना तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे !

News Desk

भाजप वेगळ्या विदर्भाची मागणी का करत नाही – भाजप आ. डाॅ. आशिष देशमुख

News Desk

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, मुख्यमंत्र्यांचा पवारांना सल्ला

News Desk