HW News Marathi
महाराष्ट्र

Ayodhya Case : आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

नवी दिल्ली। गेली अनेक दशकापासून देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज (१६ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा काल ३९ वा दिवस होता. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी त्यांचा युक्तीवाद आज पूर्ण करणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात १० अयोध्येत डिसेंबरपर्यंत कलम १४४लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना १७ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी म्हटले की, आज सर्व पक्षकार त्यांचा युक्तीवाद पूर्ण करतील, अशी आशा आहे. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होईल. मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा पूर्ण झाल्यास आज निकाल सुरक्षित ठेवला जाईल. मात्र न्यायालय काय निश्चित करणार यावर सगळे अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयकडून आज दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल. यामध्ये दोन्ही पक्षकारांना कोणत्या प्रकारचा दिलासा हवाय, हे विचारले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होईल. हिंदू पक्षकारांना एक आणि मुस्लीम पक्षकारांना एक तास देण्यात येणार आहे. तर युक्तीवादासाठी दोन्ही पक्षकारांना ४५-४५ मिनिटे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आले असून २०० शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणाचा १७ नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे, त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलसोबत आता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढ

Aprna

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी!

News Desk

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली! – सचिन सांवत

News Desk