HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालत आहे, बच्चू कडूंचा गंभीर आरोप 

मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीतील ज्या-ज्या नेत्यांना आदींची नोटीस आली आहे त्यांना चौकशीला समोर जाण्याचं आव्हान दिलं आहे.

या प्रकरणात आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील उडी घेतली आहे. ‘ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ?’ असा जहरी सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘एका तरी भाजपच्या नेत्यांवर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का?’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दरम्यान, भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी, ‘संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे’ अशी विखारी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं, २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

News Desk

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा !- नाना पटोले

News Desk

बीडमध्ये तहसीलच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात काँग्रेस आयचे परळी तहसीलदार कार्यलायसमोर ठिय्या आंदोलन

Aprna