HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजप सरकारचा निषेध!

मुंबई | राजस्थानमध्ये घडलेल्या काँग्रेसमध्ये घडलेल्या राजकीय स्फोटानंतर आता देशभरातून भाजप विरुद्ध टीकास्त्र सुरु झाले आहे. यावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. सत्ता, पैसा व बच्या जोरावर भाजप सरकार लोकनियुक्त कग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही काँग्रेसकडून भाजपवर केला जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. ‘लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे लढा उभारण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि जिंकली. मात्र, आता पुन्हा एकदा लढण्याची वेळ काँग्रेसवर आणि कार्यकर्त्यांवर आली आहे. मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आपण जी लोकशाही स्विकारली त्या लोकशाहीची हत्या होत असताना सर्वांना दिसत आहे. पुन्हा एकदा लोकशाही स्थापित करण्यासाठी आणि तिला ताकद देण्याकरता आपण काँग्रेस जणांनी एकत्र येण्याचे आणि चळवळ करण्याची गरज आहे’.

‘ सरकार पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. राजस्थानमध्ये जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही करता देखील दुर्दैवी आहे. पुन्हा एकदा राजस्थान सरकार राहीले पाहिजे. त्याकरता अधिवेशन बोलावले पाहिजे’,अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा प्रश्नावर राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करु नका – शरद पवार

News Desk

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची पंकजा मुंडेंची मागणी रास्त – प्रविण दरेकर

News Desk

तो पर्यंत अच्छे दिन येणार नाहीत !   

News Desk