HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

मुंबई | महाविकास आघाडीवर सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरु आहे असं नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काही करबुरी सूरु असल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री आणि कॉंग्रसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत नाराज व्यक्त केली होती. आणि त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान,सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा न करता तयार करण्यात आला, मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले . थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही नाराज व्यक्त त्यांनी व्यक्त केली.त्यांवर आता महसूल मंत्री आणि कॉंग्रसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. तसेच, त्यांनी महाविकासआघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. “मी अशोक चव्हाण यांना भेटलो, यामध्ये काहीही नवीन नाही. आमच्या भेटी होतच असतात. तसेच अशोक चव्हाण यांच्या खातेविभाजनचा निर्णय एकमताने घेतला जाईल”, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी अधिक भक्कम होईल. सर्व कामे नीट पार पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे माहिती आघाडी सरकारमधील नेत्यांची दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलनही करत आहोत”, मनसेचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

News Desk

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

News Desk

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा | सर्वोच्च न्यायालय

News Desk