HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी दुसरा ज्योतिषी शोधावा । बाळासाहेब थोरात

अहमदनगर । राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, सहा महिन्यात सरकार कोसळणार, दोनशे वीस जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एवढ्या पण जागा विरोधकांना मिळणार नाही, असे भाष्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत होते. मात्र, त्यांचे भविष्य खोटे ठरले आहे. आता त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा, असा टोला राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

आज राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अहमदनगर येथे ते माध्यमांशी बोलत असतांना, फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकतायत त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी शोधावा अशी बोचरी टीका थोरात यांनी केली आहे. “आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. आमच्या काळात त्या कमी झाल्या होत्या. मात्र, मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली असली तरी आता महाविकास आघाडी कर्जमाफीसारख्या योजना राबवून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे”, असेही थोरात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

News Desk

शहीद जवान नरसिंग जिल्लेवाडवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

News Desk

जल आक्रोश नव्हे हा तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

News Desk