HW News Marathi
महाराष्ट्र

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे, इथे प्रत्येकाला यायला आवडते त्यामुळे…’

बारामती। भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ गंभीर आरोप केले आहे. आता किरीट सोमय्या, ‘6 तारखेला म्हणजेच आज बारामतीला जाणार आहे’, असं म्हणत बारामतीमधील बरजंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर मंगळवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाच्या पाहणी दौऱ्यावर होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी किरीट सोमय्यांना मिश्किल टोला लगावला आहे.

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते’ असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. ‘बारामतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच केलं जाईल’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी उत्तर प्रदेशातल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

बारामतीला येणे काही नवीन नाही

किरीट सोमय्या उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता काही से मिश्किल हास्य करत सुळे म्हणाल्या की, ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे सोमय्या यांचं बारामतीला येणे काही नवीन नाही’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले.तसंच, अभिनेता शाहरुख खान याच्या मुलावर एनसीबीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना एनसीबीने केलेल्या कारवाईतून सत्य बाहेर येईलच. मी स्वतः तंबाखू आणि गुटख्याबाबत आंदोलन करत असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात गुटखा बंदी केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी झाली. यासंदर्भात शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या’, शिवसेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी!

News Desk

आहेराचे पैसे बापाने पळवले आणि मोजून देतो सांगितले, GSTवरून केंद्रावर मुख्यमंत्र्यांची टीका

News Desk

अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं – संदीप देशपांडे

News Desk