HW News Marathi
महाराष्ट्र

हवामान खात्याला पवारांनी पाठविली बारामतीची साखर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शब्द पाळत हवामान खात्याला खरोखर बारामतीची १०० किलो साखर पाठविली आहे. ‘हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,’ असं वक्तव्य पवार यांनी शनिवारी केले होते. त्यानंतर जोरदार पाऊस होऊन हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाल्याने पवारांनी वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी बारामतीवरून १०० किलो साखर पाठवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे सांगितले. ही साखर काकडे आणि अन्य पदाधिकारी आज दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यात पावसासंबंधी व्यक्त केलेल्या अंदाजात आणि परिस्थितीत तफावत आढळली होती. त्यानंतर तर हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

News Desk

शिवसेनेचे आमदार बहुदा राष्ट्रवादीमूळे निवडून आले, शरद पवारांच्या उत्तराला दरेकरांचे प्रत्युत्तर

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी केले ट्विट

swarit
मुंबई

मुलुंड-ऐरोली टोलनाक्यांवरील टोल वसुली महिन्याभरासाठी बंद

swarit

मुंबई | मुंब्रा बायपास रोडचे काम सुरु असल्याने मुलुंडमधील दोन टोलनाके तर ऐरोलीतील एक टोलनाक्यांवरची टोलवसुली बंद करण्यात आली आहे. परंतु ही टोलवसुली फक्त लहान वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापामुळे राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ही टोलवसुली साधारण महिन्याभरासाठी बंद राहील. म्हणजेच २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत लहान वाहनांची टोल वसुली बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ही टोलवसुली बंद करण्याची मागणी करून स्वतः देखील हे टोलनाके बंद पडण्याचा प्रयत्न केला होता.

Related posts

एसटी – टेम्पोच्या धडकेत नऊ ठार; १० गंभीर जखमी

News Desk

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk